˙˙जय मुक्ताई ..

Sunday, 23 October 2016

गीता प्रवचने अध्याय १ / ३

गीता प्रवचने अध्याय १ / ३

     एवढे महाभारत व्यासांनी लिहिले,पण व्यासांना स्वतःचे असे काही सांगावयाचे होते की नाही? त्यांचा विशिष्ट संदेश त्यांनी कोठे सांगितला आहे का? कोणत्या ठिकाणी व्यासांची समाधि लागली आहे? ठिकठिकाणी अनेक तत्वज्ञानांची आणि उपदेशांची जंगलेच्या जंगले महाभारतात आली आहेत.पण तत्वज्ञानांचे, उपदेशांचे आणि एकंदर सारभुत रहस्य त्यांनी कोठे मांडले का? होय,सम्रग महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गगीतेत दिले आहे. गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि मननाची संपूर्ण साठवन आहे.हिच्याच् आधारे मुनीत 'मुनि मी व्यास'ही विभूति सार्थ ठरावयाची आहे.प्राचीन काळापासून गीतेला 'उपनिषद'ही पदवी मिळाली आहे.गीता उपनिषदांचेहि उपनिषद आहे. कारण सर्व उपनिषदांचे दोहन करुण हे गीतारूपी दूध भगवंतानी अर्जुनाच्या निमित्ताने जगताला दिले आहे.जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायःप्रत्येक विचार गीतेत येवून गेला आहे.म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे असे अनुभवी पुरुषांनी म्हटले आहे. गीता हा लहानसाच पण हिंदुधर्माचा मुख्य ग्रंथ आहे.


    गीता श्रीकृष्णाने सांगितली हे तर सर्वाना माहित आहे.ही थोर शिकवण ऐकणारा भक्त अर्जुन ह्या शिकवणीशी इतका समरस झाला, की त्यालाही 'कृष्ण' संज्ञा प्राप्त झाली. देवा-भक्तांचे हे हृदगत प्रगट करीत असता व्यासदेव इतके विरघळुुन गेले की त्यानाही लोक 'कृष्ण' ह्याच नावाने ओळखु लागले. सांगणारा कृष्ण,ऐकनारा कृष्ण,रचनारा कृष्ण असे तिघांत जणू अद्वैत उत्पन्न झाले.तिघांची जणू समाधि लागली. गीतेच्या अभ्यासकाला अशीच एकाग्रता पाहिजे.

 क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 

No comments:

Post a Comment