गीता प्रवचने अध्याय १ / ५
अर्जुनाचे क्लैब्य दूर करुण त्याला युद्धप्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली गेली असे काही लोक म्हणतात. त्यांच्या मते गीता कर्मयोग सांगणारी आहे. एवढेच नव्हे तर ती युद्धयोग सांगणारी आहे. जरा विचार केला तर ह्या म्हणण्यातील चूक दिसून येईल. अठरा अक्षौहिणी सैन्य लढायला सिद्ध होते.अर्जुनाला सबंध गीता ऐकवून त्या सैन्याच्या लायकीचे केले असे का आपण म्हणणार? अर्जुन घाबरला.ते सैन्य घाबरले नव्हते. ते का अर्जुनाहून अधिक योग्यतेचे? ही तर कल्पनाच करवत नाही. शेकडो लढाया खेळलेला तो महावीर होता. उत्तर-गोग्रहणाच्या वेळेस त्याने एकट्याने भीष्म-द्रोण-कर्णाना हतबल केले होते. नेहमी विजय मिळविणारा,सर्व नरांतील एकच खरा नर अशी त्याची ख्याती होती. वीरवृत्ति त्याच्या रोमारोमात होती. अर्जुनाला डिंवचन्यासाठी क्लैब्याचा आरोप तर कृष्णानेहि करुण पाहिला. पण तो बाण वाया जाऊन पुढे वेगळ्याच मुद्यावर ज्ञान-विज्ञानांची अनेक व्याख्याने द्यावी लागली आहेत. तेव्हा क्लैब्य-निरसनाइतके सोपे तात्पर्य गीतेचे नाही हे निश्चित आहे.
दुसरे काही म्हणतात, अर्जुनाची अहिंसा-वृत्ति दूर करुण त्याला युद्धप्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली आहे. माझ्या दृष्टीने हेही म्हणने बरोबर नाही. तेँ कसे,हे पाहण्यासाठी आपणाला अर्जुनाची भूमिका तपासली पाहिजे. त्या कामी पाहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायात शिरलेले आखात फार उपयोगी आहे.
क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
अर्जुनाचे क्लैब्य दूर करुण त्याला युद्धप्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली गेली असे काही लोक म्हणतात. त्यांच्या मते गीता कर्मयोग सांगणारी आहे. एवढेच नव्हे तर ती युद्धयोग सांगणारी आहे. जरा विचार केला तर ह्या म्हणण्यातील चूक दिसून येईल. अठरा अक्षौहिणी सैन्य लढायला सिद्ध होते.अर्जुनाला सबंध गीता ऐकवून त्या सैन्याच्या लायकीचे केले असे का आपण म्हणणार? अर्जुन घाबरला.ते सैन्य घाबरले नव्हते. ते का अर्जुनाहून अधिक योग्यतेचे? ही तर कल्पनाच करवत नाही. शेकडो लढाया खेळलेला तो महावीर होता. उत्तर-गोग्रहणाच्या वेळेस त्याने एकट्याने भीष्म-द्रोण-कर्णाना हतबल केले होते. नेहमी विजय मिळविणारा,सर्व नरांतील एकच खरा नर अशी त्याची ख्याती होती. वीरवृत्ति त्याच्या रोमारोमात होती. अर्जुनाला डिंवचन्यासाठी क्लैब्याचा आरोप तर कृष्णानेहि करुण पाहिला. पण तो बाण वाया जाऊन पुढे वेगळ्याच मुद्यावर ज्ञान-विज्ञानांची अनेक व्याख्याने द्यावी लागली आहेत. तेव्हा क्लैब्य-निरसनाइतके सोपे तात्पर्य गीतेचे नाही हे निश्चित आहे.
दुसरे काही म्हणतात, अर्जुनाची अहिंसा-वृत्ति दूर करुण त्याला युद्धप्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली आहे. माझ्या दृष्टीने हेही म्हणने बरोबर नाही. तेँ कसे,हे पाहण्यासाठी आपणाला अर्जुनाची भूमिका तपासली पाहिजे. त्या कामी पाहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायात शिरलेले आखात फार उपयोगी आहे.
क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव

No comments:
Post a Comment