गीता प्रवचने अध्याय १ / ११
ह्या सर्व विवेचनावरुन एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की,गीतेचा जन्म स्वधर्माच्या आड़ येणारा जो मोह,त्याच्या निवारणार्थ आहे.अर्जुन धर्म-संमूढ झाला होता.स्वधर्माच्या बाबतीत त्याला मोह पडला होता.ही गोष्ट कृष्णाने दिलेल्या पहिल्या ठपक्यानंतर अर्जुन स्वतःच कबूल करीत आहे.तो मोह,ते ममत्व,ती आसक्ति दूर करणे हे गीतेचे मुख्य काम.सारी गीता सांगितल्यावर भगवंतानी प्रश्न केला,अर्जुना,गेला मोह?
अर्जुन म्हणाला देवा मोह मेला,स्वधर्माचे भान झाले.अशा प्रकारे गीतेचा उपक्रम आणि उपसंहार जुळवून पाहिल्यास मोह-निराकरण हेच फलित निघते.गीतेचेच नव्हे,तर महाभारताचेही हेच उद्दिष्ट आहे.व्यासानी महाभारताच्या आरंभीच म्हटले आहे की लोकांच्या हृदयातील मोहावरण घालविन्यासाठी मी हा इतिहास-प्रदीप पेटवित आहे. क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
https://geetapravachane1.blogspot.com
ह्या सर्व विवेचनावरुन एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की,गीतेचा जन्म स्वधर्माच्या आड़ येणारा जो मोह,त्याच्या निवारणार्थ आहे.अर्जुन धर्म-संमूढ झाला होता.स्वधर्माच्या बाबतीत त्याला मोह पडला होता.ही गोष्ट कृष्णाने दिलेल्या पहिल्या ठपक्यानंतर अर्जुन स्वतःच कबूल करीत आहे.तो मोह,ते ममत्व,ती आसक्ति दूर करणे हे गीतेचे मुख्य काम.सारी गीता सांगितल्यावर भगवंतानी प्रश्न केला,अर्जुना,गेला मोह?
अर्जुन म्हणाला देवा मोह मेला,स्वधर्माचे भान झाले.अशा प्रकारे गीतेचा उपक्रम आणि उपसंहार जुळवून पाहिल्यास मोह-निराकरण हेच फलित निघते.गीतेचेच नव्हे,तर महाभारताचेही हेच उद्दिष्ट आहे.व्यासानी महाभारताच्या आरंभीच म्हटले आहे की लोकांच्या हृदयातील मोहावरण घालविन्यासाठी मी हा इतिहास-प्रदीप पेटवित आहे. क्रमश (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण
जय मुक्ताई
https://geetapravachane1.blogspot.com

No comments:
Post a Comment